Sargam Koushal wins Mrs World 2022 Instagram @sargam3
मनोरंजन बातम्या

Mrs World: २१ वर्षांनी भारताला मिळाला बहुमान, सरगम कौशलने पटकावला मिसेस वर्ल्डचा किताब

भारताची सरगम कौशल झाली मिसेस वर्ल्ड, २१ वर्षांनी भारताला मिळवून दिला बहुमान.

Pooja Dange

Mrs World 2022: जम्मूच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड हा 'किताब जिंकून भारताच्या बहुमानात मनाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत ६३ देशातील महिला सहभागी झाल्या होत्या. २१ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला आहे. २००१ साली डॉ. अदिती गोवित्रीकरने हा किताब जिंकला होता.

मिसेस वर्ल्ड झाल्यानंतर सरगम कौशल यांनी एक विडिओ शेअर केला आहे. 'मी खूप आनंदी आहे. '२१-२२ वर्षांनी आपल्याला हा मुकुट परत मिळाला आहे. मी खूप उत्साहित आहे लव्ह यु इंडिया, लव्ह वर्ल्ड.' ३२ वर्षीय सरगम कौशल मूळ जम्मू-काश्मीरची आहे. सरगमने इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सरगम विशाखापट्टनम शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ साली सरगम कौशलचे लग्न झाले. तिचे पती इंडियन नेव्हीमध्ये आहे. (Celebrity)

मिसेस वर्ल्ड ही स्पर्धेचे नाव पहिले मिसेस अमेरिका होते. त्यानंतर ते बदलून 'मिसेस वूमन ऑफ द वर्ल्ड' करण्यात आले. १९८८ पासून या स्पर्धेला 'मिसेस वर्ल्ड' या नावाने ओळखले जाऊ लागले. गेल्या काही वर्षांपासून ८० देशातील महिला या देशात सहभागी होत आहेत. (World)

२००१ मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला. हे विजेतेपद पटकावणारी अदिती ही पहिली भारतीय महिला ठरली. अदिती एक अभिनेत्री आहे. भेजा फ्राय, दे दाना दान, स्माईल प्लीज यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अदिती २०२२ च्या स्पर्धेत ज्युरी म्हणून सहभागी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT