छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रिय आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नेहमीच अव्वल असते. मालिका सध्या रंजक वळणावर असतानाच मालिकेतील अजून एका कलाकाराने निरोप घेतला आहे.
खूप कमी कालावधीत 'ठरलं तर मग' मालिकेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे. घराघरात ही मालिका रोज पाहिली जाते. (Latest Entertainment News)
'ठरलं तर मग' मालिकेतील महिपत ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर लवकरच मालिकेचा निरोप घेणार आहे. मालिकेत माधव अभ्यंकर हे खलनाकाची भूमिका साकारत आहेत. त्यांचा वात्सल्य आश्रमाच्या जागेवर रिसॉर्ट बांधण्याचा प्लॅन आहे. मालिकेत साक्षी हे पात्र साकारणाऱ्या मीरा जगन्नाथचे वडिल दाखवले होते. आता महिपतच्या भूमिकेत अभिनेते मयूर खांडगे दिसणार आहे.
मालिकेतील या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेतील एका कलाकाराने एक्झिट घेतली होती. मालिकेतील साक्षी हे पात्र साकारणाऱ्या मीरा जगन्नाथने मालिकेचा निरोप घेतला होता. मीरा मालिकेत नकारात्मक भूमिकेत होती. मीराच्या जागी आता केतकी पालव ही अभिनेत्री दिसणार आहे.
एकामागोमाग दोन कलाकारांच्या मालिकेतून घेतलेल्या एक्झिटने प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मालिकेतील कलाकार नाराज तर नाही अशा चर्चांना उधाण आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.