Kangana Ranaut Reaction On The Ban Of The Kerala Story
Kangana Ranaut Reaction On The Ban Of The Kerala Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut On Adah Sharma: ‘द केरला स्टोरी’ वरील बंदी घातल्याने कंगना संतापली, म्हणाली, 'हा संविधानाचा अपमान'

Chetan Bodke

Kangana Ranaut On Adah Sharma The Kerala Story: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेली ‘द केरला स्टोरी’ चित्रपट रिलीज झाल्यापासून कमालीचा चर्चेत आहे. याला कारण ठरलंय चित्रपटाची कथा. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चित्रपटावर प्रतिक्रिया आल्यानंतर आता कंगनानेही यावर चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही चित्रपटाबद्दल आपली बाजू मांडली होती. अशातच कंगना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माबद्दल वक्तव्य केले आहे. सध्या तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच प्रतिक्रिया देते. बिंधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी कंगना पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आली आहे.

दरम्यान, कंगना रणौतने अदा शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे . मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतने चित्रपटावर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पारित केलेल्या चित्रपटावर बंदी घालणं हा तर संविधानाचा अपमान असल्याच तिनं सांगितलं आहे.’ असेही म्हटले आहे. अदा शर्माच्या या चित्रपटावर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कंगना राणौतने हे वक्तव्य केले आहे.

अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाला वादाचा फटका सहसा जास्त बसलेला नाही. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहून निर्माते आणि चाहते खूप खूश आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live : पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर; सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Rahul Gandhi: द्वेषाच्या राजकारणाला देश कंटाळलाय..., भाजपवर निशाणा साधत राहुल गांधींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन

Mumbai News: कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चपाती ऐवजी 'या' पोळ्या खा; झटपट बारीक व्हाल

Yoga For Asthma: दम्यावर रामबाण उपाय सापडला;विरासन केल्याने घेता येईल मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT