Mrs Chatterjee Vs Norway Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीचा 'तो' चित्रपट काल्पनिक ? नॉर्वे दूतावासाच्या वक्तव्याने चर्चेला उधाण, नेमकं काय आहे प्रकरण?

आज प्रदर्शित झालेला हा चित्रपट काल्पनिक असल्याचं नॉर्वे दूतावासाने सांगत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Mrs Chatterjee Vs Norway Movie: अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट आज अर्थात १७ मार्च २०२३ ला भारतात प्रदर्शित झाला. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात एका भारतीय जोडप्यावर नॉर्वेमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रण करुन चित्रपट बनवण्यात आला. या दाम्पत्याला आपल्या मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी नॉर्वे सरकारशी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान, आज प्रदर्शित झालेला हा चित्रपट काल्पनिक असल्याचं नॉर्वे दूतावासाने सांगत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटात एका स्थलांतरित भारतीय जोडप्याच्या अनुभवावर आधारित आहे. २०१२ मध्ये त्यांच्या दोन मुलांना संस्कृतीतील भिन्नतेमुळे नॉर्वेजियन फॉस्टर सिस्टमने संशय उपस्थित करत कस्टडी घेतली होती. या कस्टडीविरोधात या दाम्पत्याने कोर्टात धाव घेतली होती.

“चित्रपटात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक फरकांच्या आधारे मुलांना त्यांच्या कुटुंबापासून कधीही दूर नेले जाणार नाही. त्यांच्या हाताने खाणे किंवा मुलांना त्यांच्या पालकांसोबत अंथरुणावर झोपणे या गोष्टी मुलांसाठी हानिकारक मानल्या जात नाहीत आणि नॉर्वेमध्ये ते असामान्य नाहीत.” असं नॉर्वेच्या दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटलंय. या चित्रपटातील काही सामान्य तथ्यं योग्यरित्या तपासणे आवश्यक आहे, असंही दूतावासाने नमूद केलंय.

“मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट जरी सत्य घटनेवर आधारित असला तरी, त्याची कथा पुर्ण काल्पनिक आहे. यामध्ये ज्या प्रकरणाचा संदर्भ दिला जात आहे, तो गेल्या १० वर्षांपुर्वी घडलेला किस्सा आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि सर्व पक्षांच्या सहमतीने सोडवला गेला होता. शिवाय नॉर्वेचे बाल कल्याण विभाग नफ्यावर चालत नाही. जितकी जास्त मुलं या संगोपन पद्धतीत टाकले जातील, तितके जास्त पैसे विभागाला मिळेल हा कथित दावा पूर्णपणे खोटा आहे. काळजी घेण्याच्या उद्देशाने विभाग काम करतं, ती पैसे कमावणारी संस्था नाही” असं नॉर्वे दूतावासाने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलंय.

राणी मुखर्जीचा हा चित्रपट एका भारतीय महिला आणि तिच्या पतीच्या आयुष्यावरील खऱ्या कथेवरून प्रेरित आहे, ज्यांना नॉर्वेमध्ये त्यांच्या मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागला होता. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचाच धक्का दिला होता.  हा चित्रपट कलकत्ता येथील एका बंगाली जोडप्याच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीने दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटातील राणीच्या अभिनयाशिवाय लोकांना चित्रपटाची कथाही खूप आवडली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

SCROLL FOR NEXT