Pushpa 2 stamped : अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ प्रीमियर वेळी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अलीकडेच भाष्य केले आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना पवन कल्याण यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांचे समर्थन केले. पवन कल्याण यांनी अल्लू अर्जुनने पुष्पा २ चित्रपटाच्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ३५ वर्षीय महिलेच्या रेवतीच्या घरी भेट द्यायला हवी होती अशी खंत देखील व्यक्त केली.
पवन कल्याण म्हणाले, "कायदा सर्वांसाठी समान आहे. पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे आणि अल्लू अर्जुनने रेवतीच्या कुटुंबाला भेट द्यायला हवी होती, ज्या महिलेने या घटनेत दुःखदपणे आपला जीव गमावला होता किंवा अल्लू अर्जुनच्या वतीने कोणीतरी पीडितेच्या कुटुंबाला लवकर भेट दिली असती तर बरे झाले असते”.
या पत्रकार परिषदे दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे कौतुक करत त्यांना महान नेता म्हणून पवन कल्याण यांनी संबोधले. "तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री म्हणून चेंगराचेंगरीनंतरच्या घडामोडींना योग्य प्रतिसाद दिला. कधीकधी परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. पूर्वी माझा भाऊ चिरंजीवी देखील त्याच्या चाहत्यांसोबत चित्रपट पाहत जात असत. अन्यथा, तो मास्क घालून एकटाच थिएटरमध्ये जात असत असल्याचे देखील आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे अल्लू अर्जुनचे नातेवाईक आहेत. अल्लू अर्जुनची मावशी सुरेखा यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी, पवन कल्याणचे मोठे भाऊ यांच्याशी झाले आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ प्रिमियर शोला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर बोलण्यासाठी पवन कल्याण टाळाटाळ करत होते. मात्र आज त्यांनी या मुद्द्यावर मत व्यक्त केल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.