Indian youth Hijack Boat Patrika
क्राईम

kuwait Boat : मालकाच्या छळाला कंटाळून भारतीय तरूण पळाले; समुद्रमार्गे थेट मुंबईला पोहोचले, बोट 'गेट वे'ला धडकली, तिघांवर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian youth Hijack Kuwait Sheikh Boat :

मुंबईच्या ‘गेटवे ऑफ इंडिया’वर कुवेतच्या बोट आल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी तमिळनाडूमधील ३ मच्छीमारांना अटक केलीय. पोलिसांनी गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून या तिघांना ताब्यात घेतलं. सुरक्षा रक्षकांनी या तिघांची चौकशी केली तेव्हा त्यानी धक्कादायक खुलासा केलाय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या तिघांनी कुवेत येथील शेखची बोट या तिघांना पळवून आल्याचं सांगितलं जात आहे. (Latest News)

गुन्हा दाखल

मंगळवारी रात्री मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्याला कुवेत येथील बोट धडकल्याने मोठी खबळबळ उडली. तटरक्षक सुरक्षा दलांनी या बोटीमधील तिघांना ताब्यात घेतलंय. आंतरराष्ट्रीय सीमा पार करून विनापरवाना भारतीय सीमेत आणल्याप्रकरणी तसेच पारपत्र (पासपोर्ट) न बाळगता अवैधरित्या भारतीय हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुलाबा पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे तिघेजण भारतीय समुद्र किनाऱ्याजवळ आल्यानंतर तटरक्षक सुरक्षा दलाला त्यांचा संशय आला. त्यानंतर हे तिघे तमिळनाडू येथील असल्याची माहिती समोर आलीय. तिघेही मच्छिमार मूळ तामिळनाडूचे असून दोन वर्षापासून कुवेतमध्ये नोकरीला होत. या दोघांना कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे दोघांनी पलायन केलं असल्याचं या मच्छिमारांनी सांगितलंय.

या दोघांनी GPSच्या मदतीने कुवेत ते मुंबई असा समुद्रातून प्रवास केला. या तिघांनी कुवेतमधील त्यांच्या मालकाची बोट पळवून आणत समुद्रातून २७०० किमीचा प्रवास करत मुंबई गाठली. या तिघांनी पळवून आणलेली बोट मुंबईच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर मुंबई पोलीस गुन्हे शाखा, महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या.दरम्यान, मंगळवारी येलो गेट पोलीस स्टेशनच्या चौत्राली बोटवर पोलीस तैनात होते. हे पोलीस कर्मचारी ससून डॉक भागात समुद्रात गस्त घालत होते तेव्हा त्यांना एक संशयित बोट किनाऱ्याकडे जाताना दिसली.

कुवेतहून बोटीतून बेकायदेशीरपणे मुंबईत दाखल झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केलीय. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावर आलेली कुवेतच्या बोटीत कोणतीच संशयित वस्तू आढळून आली नाहीये. बोटीतून आलेले तिघेजण तमिळनाडू येथील असल्याचं सांगितलं. दोन वर्षांपूर्वी ते कामानिमित्त कुवेतला गेले होते. त्यांना कुवेतला घेऊन गेलेल्या एजंटने त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर ते तेथून पळून गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. 'गेटवे ऑफ इंडिया'वर पोहोचल्यावर बोटीची झडती घेण्यात आली.

चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

अटक करण्यात आलेल्या तिघांची चौकशी करण्यात आली. हे तिघे कुवेतमधील अब्दुल्ला मोहम्मद अब्दुल रहमान अल सरहिद नावाच्या व्यक्तीकडे नोकरी करत होते. हे तिघे मासेमारीचे काम करत होते. कुवेतमधील अब्दुल्लाने त्यांना गेल्या दोन वर्षांपासून पगार दिलेला नव्हता. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाही काढून घेतला होता. त्यांना वेळेवर जेवण दिले नाही आणि प्रत्येक कारणावरून त्यांना मारहाण केली.

या सर्व प्रकाराला कंटाळून तिघेही मासेमारी बोट घेऊन तेथून पळून जाण्यास तयार झाले. कुवेतहून इराण, कुवेत बॉर्डर, सौदी, कतार, दुबई बॉर्डर आणि त्यानंतर भारताच्या जीपीएसच्या मदतीन ते जहाजाने १० दिवसांत मुंबईत पोहोचले, असल्याची माहिती या तिघांनी चौकशीत दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT