दिल्लीतील नोएडाच्या उचभ्रू भागात शुक्रवारी ३२ वर्षीय एअर इंडियाचा क्रू मेंबर सूरज मानची हत्या झाल्याची घटना घडली. या हत्या प्रकरणात पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. १०० एकर जमीन,वर्चस्वाची लढाई आणि १५ वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षातून सूरज मानची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून आतापर्यंत ५ हत्या झाल्या आहेत. (Latest Marathi News)
सूरज हा मूळचा दिल्लीच्या नरेला क्षेत्राच्या खेडा खुर्द गावात राहत होता. कुख्यात आरोपी प्रवेश उर्फ सागर मान त्याचा मोठा भाऊ आहे. सध्या तो गाव सोडून नोएडा येथे राहत होता. त्याच्याजवळ कपिलमान उर्फ कल्लूचंही घर आहे.
प्रवेश आणि कपिल सध्या मंडोली जेलमध्ये बंद आहेत. गेल्या १५ वर्षांपासून दोन्ही कुटुंबात संघर्ष सुरु आहे. दोघांमध्ये गावातील १०० जमीनीवरून वाद सुरु झाला होता. या वादावरूनच हत्येचा खेळ सुरु झाला. कपिल गँगने २०१९ मध्ये प्रवेशचा चुलत भाऊ अनिल मानचही हत्या केली होती.
याच वर्षी प्रवेशचा चुलता वीरेंद्र मानची हत्या करण्यात आली होती. प्रवेशचा मित्र मनीष मानवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर १९-२० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मात्र, तो त्यातून थोडक्यात बचावला. तर प्रवेश मान गँगने २०२२ साली कपिलच्या वडिलाची हत्या झाली. तर याआधी २०१७ साली कपिलचा चुलता सूर्य प्रकाश बबलूची हत्या झाली होती.
सूरजची हत्या कपिलच्या वडिलांच्या हत्येच्या बदल्यात केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला आहे. यासाठी २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.