आता सरकार E30 ची तयारी करत असल्याचा दावा केल्याने खळबळ उडालीय.सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होतोय.E20 मुळे सध्या देशभरात गोंधळ निर्माण झालाय...अनेकांनी गाड्या खराब झाल्याचा आरोप केलाय...आणि सरकार आता E30 आणण्याचा विचार करत असेल तर हे प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.पण, या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
सरकारने पुढील 5 वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य 30% पर्यंत वाढवलं आहे. सरकार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवलंय. हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली.कारण, हा विषय देशभरातील वाहनचालकांचा आहे.सध्या E20 वरून अनेकांनी गडकरींवर निशाणा साधलाय.
CJP सारखीच E20 पार्टीही तयार करण्यात आलीय, असं असतानाही खरंच सरकार पुढील 5 वर्षात E30 आणण्याचा विचार करतंय का.? याची माहिती मिळवली. त्याआधी E30 म्हणजे 30% इथेनॉल आणि 70% पेट्रोल असतं..पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय हा हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी केली.याबाबत सरकारकडून माहिती मागवली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
इथेनॉल वाढवण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही
2030 पर्यंत 30% इथेनॉल मिश्रणाचा दावा खोटा
E30 साठी सध्या पेट्रोलच्या गाड्या अनुकुल नाही
2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य होतं
इथेनॉलच्या वापरामुळे इथेनॉल उत्पादनात शेतकऱ्यांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील हे खरं आहे...पण इथेनॉलचा अधिकचा वापर सगळ्याच वाहनांना चालणारा नाहीये.सध्याच्या पेट्रोल गाड्या फक्त E20 पर्यंतच्या इंधनासाठीच अनुकूलित केलेल्या आहेत.त्यामुळे अजून इथेनॉलची मात्रा वाढवली तर वाहनांवर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे सरकारने आता E30 ची तयारी केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.