Osmanabad: कायम दुष्काळाच्या झळा, कधी कोरडा तरी कधी ओला... कैलास चौधरी
ब्लॉग

Osmanabad: कायम दुष्काळाच्या झळा, कधी कोरडा तरी कधी ओला...

उस्मानाबाद म्हणजे दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा वर्षानुवर्ष पाणीटंचाई, कोरोडा दुष्काळ, टँकरग्रस्त भाग म्हणून याची ओळखला निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद म्हणजे दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा वर्षानुवर्ष पाणीटंचाई, कोरोडा दुष्काळ, टँकरग्रस्त भाग म्हणून याची ओळखला निर्माण झाली आहे. मात्र मागील वर्षीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय या भागात शेती करणं म्हणजेच जुगारवर पैसे लावण्याचा धंदा होऊन बसला आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे पिकांचं नुकसान झालं हे आपण नेहमी पाहिलं आहे. मात्र मागील वर्षीपासून जिल्ह्यात अक्षरशः तुफान पाऊस बरसतोय. यात शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासोबतच शेती ही वाहून जात असल्याचं पाहायला मिळते मागील वर्षी जिल्ह्यातील उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या तीन तालुक्यांना या पावसाचा जोरदार फटका बसला होता. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीसह वाहून गेली होती. या वर्षी देखील काही वेगळी स्थिती नाही. मोठ्या धरणा काठच्या जमिनी मध्ये आज घडीला पाणीच पाणी आहे. उभा असलेला ऊस आडवा झाला आहे तर सोयाबीन पाण्यात गेलं आहे.

हा फटका फक्त शेतातील उभ्या असलेल्या पिकांना बसतोय असं नाही दाऊतपुर शिवारातील जवळपास 57 जनावर शेतकऱ्यांपासून दुरावली आहेत. यातली काही मृत झाली तर काही पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाली दाऊतपूर येथील नारायण कोळपे या वृद्ध शेतकऱ्यांने शेतातील गोठ्यात गाय आणि वासरू बांधले होते. पाऊस पडण्याच्या दोन दिवसापूर्वी कोळपे आजारी असल्यास ते शहरातील खाजगी रुग्णालयात ऍडमिट होते. डिस्चार्ज मिळालेल्या रात्री थकवा आल्याने यांनी शेतात जाणं टाळलं. त्यांना फक्त दोन मुली आहेत त्यांची लग्न झालेली आहेत. त्यामुळे नारायण कोळपे यांच्या शिवाय शेतात जाणारे दुसरे कोणी नाही, आणि त्याच रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली शेतातील इतर पिकाचे नुकसान तर झालेच त्यासोबतच गोठ्यात बांधलेली गाय आणि वासरू चक्क पाण्यात बुडाली आणि तडफडून मेली.

नारायण कोळपे या एकाच शेतकऱ्याची ही व्यथा नाही जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावर मुसळधार पावसाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागले आहे कमी कालावधीत अधिक उत्पन्न आणि पैसा देणार पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते मात्र पावसाच्या लहरीपणा मूळ याचे उत्पन्न आतबट्ट्याचा खेळ झाला आहे घरांची पडझड झाली हे दुःख तर वेगळच.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT