बातम्या

प्लास्टिकबंदी तर झाली... प्लास्टिकचा वापर थांबला आहे का?   

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यात प्लास्टिंकबंदी लागू करण्यात आली असली, तरी खरोखरंच प्लास्टिकचा वापर थांबला आहे का? हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये, म्हणून लोणावळ्यात थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. लोणावळ्यातील व्ही के वॉर्रन या दुकानाला लोणावळा नगरपरिषदेनं तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. प्लास्टिक कॅरीबॅग वापरली म्हणून हा दंड ठोठावण्यात आलाय. राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर भाजी बाजारात प्लास्टिकबंदी संबंधी ठिकठिकाणी फलक लागलेले दिसत आहेत.  मात्र या पार्श्वभूमीवर भाजीविक्रेते आणि ग्राहक यांच्या प्लास्टिकवापरामध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत नाही. ग्राहकांना अजूनही कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे प्लास्टिकची पिशवी द्या, अशी मागणी केली जाते. दरम्यान, मुंबईतील काही मंडयांमध्ये प्लास्टिकऐवजी वर्तमानपत्रात भाज्या बांधून द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मात्र लोणावळ्यात करण्यात आलेल्या कारवाईमुळे विक्रेते प्लास्टिकचा वापर थांबवतात का, हे पाहणं महत्वाचंय.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT