Bharat Bhaskar Jadhav
देवी-देवतांना परिक्रमा मारणे हा हिंदू धर्मातील एक प्राचीन आणि महत्त्वाचा विधी आहे. परिक्रमा करण्याची अनेक कारणे आहेत. आज आपण ते जाणून घेऊ.
परिक्रमा मारणे हा देवी-देवतांविषयी आदर आणि त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. यातून भक्त त्यांची भक्ती आणि निष्ठा दाखवतात.
अनेक लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी-देवतांना प्रदक्षिणा मारत असतात. प्रदक्षिणा केल्याने देव भक्तांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असतो.
देव-देवतांच्या प्रदक्षिणा घातल्या तर पापांचा नाश होत असतो. परिक्रमेदरम्यान, भक्त त्यांच्या चुकांचे प्रायश्चित करतात आणि देवाकडे क्षमा मागतात.
परिक्रमा हा देखील आध्यात्मिक प्रगतीचा एक मार्ग आहे. याद्वारे भक्तांना ईश्वराच्या जवळ जाऊन आत्मिक शांती प्राप्त होत असते.
मंदिरांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. परिक्रमा केल्याने भक्त ही सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होत असतात.
परिक्रमा केल्याने मन एकाग्र होऊन चिंता दूर होत असते. हे भक्तांना वर्तमान क्षणात जगण्यास आणि देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करते.
परिक्रमा हा देखील सामाजिक संवादाचा एक मार्ग आहे. याद्वारे भक्त एकमेकांना भेटतात आणि त्यांची श्रद्धा व्यक्त करतात.
येथे क्लिक करा