बातम्या

धुळ्यात पाच जणांची जमावाकडून हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क

अफवांचा बाजार गरम झाला की तो लोकांच्या कसा जिवावर उठतो हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात जमावानं मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केलीय.

राईनपाडा गावात आज बाजाराचा दिवस होता. बाजारात सातारा सांगलीकडची टोळी मुलं पळवण्यासाठी आल्याची अफवा पसरली. ही अफवा असतानाच पाच जण निष्पाप गावकऱ्यांच्या तावडीत सापडले. या पाच जणांना अमानुष मारहाण करण्यात आली.

रक्तबंबाळ अवस्थेत या पाचही जणांना ग्रामपंचायत कार्यालयात टाकण्यात आलं. तिथंही त्यांना मारहाण झाली. ही मारहाण एवढी अमानुष होती की पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मारहाण झालेल्यांना सोडवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण  पोलिसांवरच जमावानं हल्ला केला. यात दोन पोलिस जखमी झालेत. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवेनं अनेक निष्पापांनी मार खाल्ला होता. आता तर पाच जण निष्पाप या अफवेचे बळी ठरलेत.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT