बातम्या

आम्ही एकमेकांची जिरवत राहिलो; राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर  

सकाळ न्यूज नेटवर्क

माझे मित्र राज ठाकरे यांना एक प्रश्न पडला, की एवढे वर्ष आपण प्रयत्न करत होतो. तर जलसंधारणाची कामं का झाली नाही ? याला कारणीभूत लोकं नाहीत. याला कारणीभूत आम्ही आहोत. सरकारने एक घोषणा दिली होती, की 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'. मात्र, आम्ही 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'ची घोषणा विसरलो आणि एकमेकांचीच जिरवत राहिलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

पानी फाऊंडेशननिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत, म्हणून जलसंधारणाची काम करायची की नाही, असा प्रश्न आमीर खानला पडला होता. मात्र, मी आमीरजीला वचन देतो, की जिथे पाणी आहे, तिथे आम्ही सर्व एक आहोत, पाणी फाऊंडेशन, वॉटर कपचे कोणीही राजकारण करणार नाही, असे मी आम्हासर्वांच्या साक्षीने वचन देतो.

आत्तापर्यंत जलसंधारणाची कामं झाली नाहीत, या परिस्थितीला लोकं कारणीभूत नसून, आम्ही आहोत. सरकारने एक घोषणा दिली होती, की 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'. मात्र, आम्ही 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'ची घोषणा विसरलो आणि एकमेकांचीच जिरवत राहिलो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT