बातम्या

शेतकऱ्यांचा संघर्ष नाटकी - केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह

सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - बळीराजाचे प्रश्न काय आहेत हे ऐकून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांचा संघर्ष 'नाटकी' असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या संपाविषयी केले आहे. शेतकरी आंदोलन म्हणजे एक प्रकारचा 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचं त्यांनी म्हटले आहे. 

देशभरात १ जूनपासून दहा दिवस शेतकऱ्यांचा संप आहे. या आंदोलनाविषयी पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, आणि शेतकरी संप हे त्याचेच उदाहरण आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सरकारची उदासीनता तसेच नैसर्गिक आणि आर्थिक संकटाचा सामना करणारे देशभरातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेते आणि मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत. त्यात केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनीही भर टाकली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ishan Kishan Fined: पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का! इशान किशनवर BCCI कडून मोठी कारवाई

Success Tips: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? या सवयी महत्वाच्या

Today's Marathi News Live: नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT