बातम्या

भाजपनं ठरवलं तर आम्ही ठाकरे सरकार पाडू : नारायण राणे 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "" जर भाजपने ठरवलं तर आम्ही ठाकरे सरकार कधीही पाडू,'' असा इशारा आता भाजप नेते नारायण राणे यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसापासून भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून हे सरकार पाडण्याचे विधान जवळजवळ सर्वच नेते करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेत आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नसल्याचे म्हणतानाच यापुढे शिवसेनेशी युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. 


आता राणे यांनीही सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा कोकणाला कोणताच योगदान नाही, सांगावं त्यांनी कोणतं योगदान दिले आहे. आरोग्यव्यवस्थेबाबत काहीही चर्चा नाही. विकासकाम बंद तर विकास काय करणार ? 

राज्य कोकणासह मागे घेऊन देण्याचं काम करत आहे.भराडी आईच दर्शन घेतलं आणि लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम केलं. थापा मारून विकासाला निधी न देता, कॅबिनेट न करता ते गेले असेही राणे यांनी म्हटले आहे. 
 

WebTittle :: If BJP decides, we will defeat Thackeray government: Narayan Rane


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

SCROLL FOR NEXT