बातम्या

भाजपनं ठरवलं तर आम्ही ठाकरे सरकार पाडू : नारायण राणे 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "" जर भाजपने ठरवलं तर आम्ही ठाकरे सरकार कधीही पाडू,'' असा इशारा आता भाजप नेते नारायण राणे यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसापासून भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून हे सरकार पाडण्याचे विधान जवळजवळ सर्वच नेते करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेत आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नसल्याचे म्हणतानाच यापुढे शिवसेनेशी युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. 


आता राणे यांनीही सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा कोकणाला कोणताच योगदान नाही, सांगावं त्यांनी कोणतं योगदान दिले आहे. आरोग्यव्यवस्थेबाबत काहीही चर्चा नाही. विकासकाम बंद तर विकास काय करणार ? 

राज्य कोकणासह मागे घेऊन देण्याचं काम करत आहे.भराडी आईच दर्शन घेतलं आणि लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम केलं. थापा मारून विकासाला निधी न देता, कॅबिनेट न करता ते गेले असेही राणे यांनी म्हटले आहे. 
 

WebTittle :: If BJP decides, we will defeat Thackeray government: Narayan Rane


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT