बातम्या

अर्थसंकल्प म्हणजे इलेक्शन स्टंट- अण्णा हजारे

सकाळ न्यूज नेटवर्क

राळेगणसिद्धी : केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे इलेक्शन स्टंट आहे. हे सरकार म्हणजे घोषणाबाज व फसवे सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

अण्णा म्हणाले, की निवडणूका आल्या की घोषणा खूप होतात. निवडणूक काळात आश्वासनांची गाजरे दाखवली जातात. मात्र अंमलबजावणी होत नाही. या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा यापूर्वीही निवडणुकीत केल्या होत्या. या बजेटमध्ये स्वामिनाथन आयोगाचा उल्लेख नाही. या पूर्वी आम्ही सत्तेत आलो तर कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात येईल असे जाहीर केले. मात्र, शेतीमालाला बाजारभाव नाही. शेती माल रस्त्यावर फेकत आहेत. शेती मलाला दीडपट हमीभाव देऊ असे जाहीर केले मात्र अद्याप दिला नाही. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार पेन्शन ही थट्टा आहे. कर्जमाफी फसवी ठरली तसेच कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा देऊ असे सांगितले मात्र बजेटमध्ये उल्लेख नाही. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी ठिबक व तुषारवरील जीएसटी कमी करण्याचे अश्वासनही हवेत विरले आहे. 

इलेक्शन जवळ आले, की गाजर दाखवतात. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही अशी टीकाही हजारे यांनी केली.

Web Title: Anna Hazare target BJP government on Budget 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT