Soybean Crop Saam tv
ऍग्रो वन

सोयाबीनच्या उत्पन्नात घट; बळीराजाचा खर्चही निघणे कठीण

सोयाबीनच्या उत्पन्नात घट; बळीराजाचा खर्चही निघणे कठीण

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : यावर्षी अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अनेकांची शेती पडीक राहिली. तर ज्‍यांची पिकांची लागवड होती; त्‍यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनचे (Soybean) उत्पन्न घटले असून यंदा खर्चही भरून निघण्याची शक्यता राहिलेली नाही. (Letest Marathi News)

वर्धा (Wardha) जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीन मुख्य पीक आहे. जवळपास एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली. (Heavy Rain) अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. साचलेल पाणी, वाढलेलं तन यामुळे नुकसानीत भर पडली. मध्यंतरी परतीच्या (Rain) पावसानही नुकसान झाले.

एकरी दोन क्विंटलपर्यंत उत्‍पन्‍न

सोयाबीन काढणी सुरू असताना एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंतच उत्पन्न मिळत आहे. यामुळ शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे खर्च निघणंही कठीण आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा नुकसान सहन करावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT