Thane Rain Saam tv
ऍग्रो वन

Thane Rain : ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका; ९० टक्के भात शेती गेली वाया

Ambarnath News : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे

अजय दुधाणे

बदलापूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा ठाणे जिल्ह्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापुर तालुक्यात जवळपास ८० ते ९० टक्के भातशेती या पावसामुळे अक्षरशः वाया गेली आहे.

राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात झालेल्या मुसळधार (Rain) पावसामुळे शेतीचे अगोदरच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला होता. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी कसातरी पीक काढणीला लागला होता. मात्र आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 

ठाणे (Thane) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील आठवडाभर या भागात जोरदार परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे कापणीला आलेले भाताचे पीक अक्षरशः झोपले आहे. शेतात गुडघाभर पाणी साचलं असून भात पिकाला कोंब फुटल्यामुळे हे पीक वाया गेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी रडकुंडीला आला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT