ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी इंद्रेश्वर शुगर्स उपळाई , लातूर जिल्ह्यामधील श्री साईबाबा शुगर्स आणि सचिन घायाळ शुगर्स पैठण या कारखान्यांनी थकवली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांची Farmers कोट्यवधी रुपयांची देणी इंद्रेश्वर शुगर्स उपळाई Indreshwar Sugars Upalai, लातूर Latur जिल्ह्यामधील श्री साईबाबा शुगर्स Shri Saibaba Sugars आणि सचिन घायाळ शुगर्स पैठण Sachin Ghayal Sugars Paithan या कारखान्यांनी थकवली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी swabhimani Farmers संघटनेच्या वतीने साखर आयुक्त, पुणे Pune आणि औरंगाबाद प्रादेशिक सह संचालक यांना निवेदन देण्यात आले आहे.

मात्र, प्रादेशिक सह संचालकांकडून कारखान्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे १५ ऑगस्ट दिवशी औरंगाबाद Aurangabad येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कारखान्याला घातलेल्या, उसाची देणी १४ दिवसांच्या आत देणे कारखान्यांना बंधनकारक आहे.

हे देखील पहा-

जालना जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी बार्शी Barshi तालुक्यातील इंद्रेश्वर शुगर्स, औसा तालुक्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी (बु) आणि पैठण तालुक्यातील सचिन घायाळ शुगर्स ( संत एकनाथ ) या कारखान्यांनी थकवली असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस सोलापूर जिल्ह्यामधील इंद्रेश्वर शुगर्स, लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी (बु) आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सचिन घायाळ शुगर या ३ साखर कारखान्यांना देण्यात आला आहे.

मागील ५ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोटींची देणी थकविली आहेत. विशेष बाब म्हणजे श्री साईबाबा शुगर्स या कारखान्याने शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात दिलेले धनादेश खात्यावर रक्कम नसल्यामुळे वटले नाहीत. या सर्वच कारखान्यांचे जानेवारी ते एप्रिल २०२१ पर्यंतची ही देणी थकीत आहेत. उसाचे बिल वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. हे साखर कारखानदार थकीत देणी कधी देणार? याबाबत ऊस उत्पादकांमधून संताप व्यक्त करत आहेत.

अद्यापही या साखर कारखान्याच्या विरोधामध्ये साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली नसल्यामुळे, या कारखान्याकडील थकीत देणी व्याजासह या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक सह संचालक कार्यालयात १५ ऑगस्ट दिवशी धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT