Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : पावणेसात लाख शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान; कापूस- सोयाबीन ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक

Parbhani News : परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कापूस व सोयाबीन पिकांचे ई पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. 

परभणी (Parbhani News) जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या नुकसानीच्या मोबदल्यात उपाययोजना आखून राज्य शासनाने गतवर्षीच्या (Soyabean Crop) सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी इ पीक पेरावर पिकांची नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 

महिनाभरात मिळणार अनुदान 

परभणी जिल्ह्यात ६ लाख ८६ हजार ९४७ शेतकरी (Farmer) पात्र ठरले असून त्यांचे आधार व बँक खात्याचे संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा, यासाठी त्यांचे वैयक्तिक ना हरकत पत्र गावोगावी कृषी सहायकाच्या माध्यमातून भरून घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावणे सात लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाचे पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य येत्या महिनाभरात मिळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT