palghar, Chilli Crop saam tv
ऍग्रो वन

Palghar : किडीच्या प्रादुर्भावामुळं पालघरातील मिरची संकटात; उत्पादन घटणार, शेतकरी चिंतेत

औषध फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने हजारो हेक्टर वरील मिर्चीची लागवड अस्मानी संकटात सापडली आहे.

रुपेश पाटील

Palghar : पालघर (palghar) जिल्ह्यात डहाणू, पालघर, तलासरी या तालुक्यांमध्ये चार हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर मिर्चीची (chilli crop) लागवड केली जाते. परंतु वातावरणातील बदलामुळे सध्या मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बहुतांश ठिकाणी मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

पालघर जिल्ह्यात तिखट मिरचीसह, आचारी मिरची, भोपळी मिरचीचे उत्पादन घेतलं जाते. सध्या मिरचीच्या झाडावर येणाऱ्या थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लाय किडीच्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चितेंत पडला आहे. (Maharashtra News)

सध्या लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली मिर्ची संकटात आली आहे. औषध फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने हजारो हेक्टर वरील मिर्चीची लागवड अस्मानी संकटात सापडली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादनात कमालीच घट हाेणार आहे. परिणामी शेतक-यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT