मंत्री बच्चू कडू Saam Tv
ऍग्रो वन

कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - पालकमंत्री बच्चू कडू

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात काल अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसाने अकोला जिल्ह्याला झोडपत शेती पिकांसह फळ पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. खरीपातील तुर व कपाशी तर रब्बीतील हरबरा,गहु व ज्वारी तसेच फळ पिकांना मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील अकोला (Akola), मुर्तिजापूर,पातुर, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोट तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा :

रब्बीच्या सुरवातीलाच गारपिटीमुळे रब्बी हंगामावरही आता अनिश्चिततेचे सावट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने महसूल विभाग, पिक वीमा कंपनी, कृषी विभाग यांच्या संयुक्तरीत्या नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हे करावे आणि शेतकऱ्यांना शेत नुकसानाची (Crop Damage) भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचा आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी (Farmers) सुटणार नाही अशी ग्वाहीही पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT