Wheat Crop Saam tv
ऍग्रो वन

Wheat Crop : जालना जिल्ह्यात यंदा गव्हाचा पेरा घटला; केवळ १३ हजार हेक्टरवर पेरणी

Jalna News : जालना जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाल्याने हा हंगाम वाया गेला आहे. तर रब्बी हंगामालाही पाणी नसल्यामुळं शेतकरी चिंतेत

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यात यंदा गव्हाच्या पेऱ्यात मोठी घट झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर (Rabi Crop) रबीच्या हंगामात उत्पन्न घेण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने यंदा गव्हाचा पेरा घातल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Jalna) जिल्ह्यात यंदा केवळ १३ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. (Maharashtra News)

जालना जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाल्याने हा हंगाम वाया गेला आहे. तर रब्बी हंगामालाही पाणी नसल्यामुळं शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Rain) झाल्याने अनेक भागात पिकांना त्याचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ही झाले होते. यानंतर रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांना वेगही आला होता. त्यानुसार पेरणी झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ९८० हेक्टरवर पेरण्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात गव्हाचा पेरा घटला असून ४८ हजार हेक्टरपैकी केवळ १३ हजार ७४९ हेक्टरवर पेरणी झाली. त्यामुळं यंदा गव्हाच्या किमती वाढणार असून चपाती महाग होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT