Climate Change Saam tv
ऍग्रो वन

Climate Change : ढगाळ वातावरणाचा खरबूज, मोसंबीवर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादक शेतकरी अडचणीत

Jalna News : जालना जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना फटका जालना जिल्ह्यात जवळपास तीस हजार हेक्टरवरती मोसंबीचे पीक घेतले जाते

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे/ बालाजी सुरवसे 

जालना/ धाराशिव : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यात जालना जिल्ह्यात मोसंबी पिकांवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे दिसून येत आहे. तर धाराशिव जिल्ह्यात खरबूजसह हरभरा, ज्वारी, मका या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव पडला आहे. 

जालना जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना फटका बसत आहे. जालना जिल्ह्यात जवळपास तीस हजार हेक्टरवरती मोसंबीचे पीक घेतले जाते. यापैकी जवळपास सोळा हजार हेक्टरवर मोसंबीवरील बागांवर ढगाळ वातावरणामुळे मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आहे. याचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

मागणी नसल्याने दरही घसरले 

दुसरीकडे उत्तर भारतामध्ये थंडीचे लाट पसरल्याने मोसंबीची मागणी कमी झाल्याने मोसंबीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे एकीकडे मोसंबीला कमी दर मिळत आहे. तर दुसरीकडे मंगू रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

खरबुज फळ बागेला करप्या रोगाचा प्रादुर्भाव 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र फळबागांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या खरबूज फळबागा आहेत. मात्र याला देखील ढगाळ वातावरण व करप्या रोगाचा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी शेतकरी महागड्या औषधी घेऊन फवारणी करत आहे. अर्थात यात खर्चाची आणखी भर पडली आहे. 

महावितरणमुळे पुरेसे पाणीही देता येईना 

त्यातच महावितरणचा भोंगळ कारभारामुळे कृषी पंपासाठीची वीज पुरेशी उपलब्ध होत नाही. यामुळे शेतातील पिकांना पुरेसे पाणी न मिळाल्याने तीन एकर क्षेत्रावरील खरबूज मातीमोल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करुन देखील उत्पन्न घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT