Heavy Rains: हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या
Heavy Rains: हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या  Saam Tv
ऍग्रो वन

Heavy Rains: हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबायचं नाव घेत नाही. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं मका आणि कापसाचे पीक वाया गेल्यामुळे नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कृषीमंत्र्यांच्या मालेगाव तालुक्यातील देवारपाडे मधील शेतकरी शिवाजी सरोदे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

हे देखील पहा-

त्यांची अवघी दीड हेक्टर जिरायती शेती आहे. यात त्यांनी खरीपाचे कापूस लागवड आणि मका पेरणी केली होती. दोन्ही देखील पिकं ऐन काढणीवर आलेली असतांना मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या मका आणि कापसाच्या शेतात पूर्णपणे पाणी साचले होते. यामुळे अगदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे ते हताश झाले होते.

एकीकडे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे हातउसनवारी करून घेतलेलं कर्ज फेडायची चिंता या विवंचनेतून त्यांनी हे मोठे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा तर सुरु आहेत.

मात्र, अद्याप मदत काही मिळायला तयार नाही. ती कधी आणि किती मिळेल, याबाबत देखील निश्चित खात्री नसल्याने हताश बळीराजाकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीच्या केवळ घोषणा नको, तर प्रत्यक्ष मदत करण्याची आणि शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT