महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या! विनोद जिरे
ऍग्रो वन

महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या!

विनोद जिरे

बीड : वीज कट केल्याने पीक वाळून चालली, या विवेचनातून कृष्णा गायके या 23 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून, महावितरणने केलेला खून आहे, म्हणुन महावितरणवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. ही मागणी घेऊन गेवराईच्या महावितरण कार्यालयात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह, शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हे देखील पहा-

वीज कट केल्याने कृष्णा गायके या तरुण शेतकऱ्याने, आपले जीवन संपवले आहे. एवढे होऊन देखील MSEB ने त्या गावातील कृषी पंपाची वीज जोडून दिलेली नाही. अजून किती जणांचा बळी यांना लागणार आहे..? असे सवाल करत महावितरणावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे.

कृषी पंपाची वीज जोडणी तात्काळ करा, नसता वाळून चाललेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह, निपाणी जवळका येथील शेतकऱ्यांनी, गेवराई येथील महावितरणच्या कार्यालयातच, ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT