Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : रब्बी हंगामातही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झटका; जिल्ह्यात केवळ ४ कोटीचीच नुकसान भरपाई

Dharashiv News : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. यामुळे शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरु केली आहे. यात पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतकऱ्यांसाठी खरीप व रब्बी हंगामासाठी [पीक विमा उतरविला होता. मात्र खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही विमा कंपनीने शेतकऱ्यांना झटका दिला आहे. विमा कंपनीला शेतकरी हिस्सा व शासनाकडुन २१२ कोटी ३६ लाख रुपये देय असतानाही कंपनीने केवळ ११ हजार ४३ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख नुकसान भरपाई दिली आहे. 

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. यामुळे शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी (Crop Insurance) पीक विमा योजना सुरु केली आहे. यात पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. मात्र शेतकऱ्यांना (Farmer) हि मिळणारी भरपाई उशिराने मिळत असून त्यात देखील कंपनीकडून शेतकऱ्याचे नुकसान केले जात असल्याचा अनुभव येत आहे. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यातील ७ लाख १९ हजार ६३३ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. यासाठी ४ लाख ८५ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावरील विमा संरक्षित होता.  

१३ हजार ५९० शेतकरी वंचित 
तर कंपनीच्या (Crop Insurance Company) म्हणण्याप्रमाणे २४ हजार ६३३ पुर्व सुचना दिल्या असून यापैकी ११ हजार ४३ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख नुकसान भरपाई मिळाली आहे. तर १३ हजार ५९० शेतकऱ्यांना विमा कंपनीने मदतीपासून वंचित ठेवले आहे. वास्तविक १ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यानी विमा कंपनीला पुर्व सुचना दिल्याची शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहीती आहे. परंतु कपंनीकडुन शेतात नुकासीचे सर्वे करण्यासाठी कोणी फिरले नसल्याचा आरोप अनिल जगताप यांनी केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहीले असून तक्रार निवारण समीतीची बैठक घेवुन शहानिशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT