बुलढाणा : शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्याला मिळालेला नाही. अवकाळीने (Buldhana) झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. या विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. (Breaking Marathi News)
अवकाळी पाऊस व गरपीटीने खामगावसह संपूर्ण जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी; या व अन्य मागण्यांसाठी काँग्रेसने आयोजित केलेला महाविकास आघाडीचा मोर्चा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यात शेतकरी देखील सहभागी झालेला होता.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे- मोदी शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांचे मरण, सरकारचे धोरण अशा लिहलेल्या टोप्या डोक्यात घालून सरकारचा निषेध नोंदविला. हा मोर्चा संत तुकाराम कुणबी समाज भवनातून मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यावर पोहोचला. यावेळी शासन विरोधी घोषणाने परिसर दणाणून गेला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.