Amravati Agriculture News
Amravati Agriculture News Saam Tv
ऍग्रो वन

अमरावती जिल्ह्यात BBF तंत्रज्ञान पद्धतीने तूर; सोयाबीनची पेरणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र यावर्षी काही गावातील शेतकरी पारंपरिक पेरणी पद्धतीला फाटा देत बीबीएफ म्हणजेच रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन (Soybean) व तुरीची पेरणी करत आहेत. कृषी विभाग अमरावती (Amravati) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञान आधारित पेरणी पद्धतीचं प्रात्यक्षिक देवून शेतात पेरणीसाठी मार्गदर्शन करत आहेत.

हे देखील पाहा -

पाऊस जास्त झाल्यावर शेतातून पाणी वाहून जाऊ नये म्हणून उताराला आडवी पेरणी करावी, अशा सूचना शेतकऱ्यांना कृषी तज्ञांकडून दिल्या जात होत्या, काही प्रमाणात शेतकरी याचा अवलंब करत होते.याचा सकारात्मक परिणाम न दिसत असल्याने उत्पादनात घट होत असलाचं निदर्शनास आले. परंतु आता जलस्थानी मृदसंधारण व्हावे,आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी सोयाबीन व तूर पेरणी बिबीएफ पद्धतीचा अवलंब करावा यासाठी जिल्ह्या मध्ये शेतात जाऊन प्रात्यक्षिक दिल्या जात असून प्रत्यक्षात पेरणी साठी मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या या नवीन पेरणी पद्धतीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास एकरी 8 किलो बियाण्याची बचत होते, मूलस्थानी जलसंधारण मृदसंधारण, तसेच पावसातील खंड आणि अतिपावसाने पिकांचे संरक्षण होऊन एकरी 25 टक्के उत्पादनात वाढ होते.सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सौ. नीता कवाने यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT