Nanded News, Banana saam tv
ऍग्रो वन

Nanded Banana Price Dropped: केळीचा भाव गडगडला, अवकाळी, गारपीटाच्या संकटानंतर शेतकरी आर्थिक गर्तेत

Banana Price Dropped In Nanded: शासनाने शेतक-यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded Banana Farmers News : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरची केळी प्रसिद्ध आहेत. सध्या केळी काढणीला आली आहे. परंतु केळीचे भाव अचानक घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. (Maharashtra News)

अर्धापूर (ardhapur) येथील शेतकरी केळीचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. अर्धापूर येथील केळींना राज्यभरातून माेठी मागणी असती. सध्या केळी काढणीला आली आहेत परंतु त्याला याेग्य दर मिळत ऩसल्याचे चित्र आहे. वर्षभर केळीला बाविशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.

सध्या केळी काढणीला आली असताना बाजारात केळीला भाव प्रती क्विंटल पाचशे ते सहाशे रुपये मिळतोय. त्यामुळे नांदेड (nanded) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली.

अवकाळीचा देखील केळीला मोठा फटका बसला आहे. अवकाळीच्या तडाख्यातून काही प्रमाणात केळीचे पीक वाचले आहे. परंतु आता केळी काढणीला आल्याने अचानक भाव पडल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने केळी उत्पादक शेतक-यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT