अमडापूर प्रकल्पाला शेती- घर देणाऱ्या बाधितांच्या स्वप्नाची राखरांगोळी संजय राठोड
ऍग्रो वन

अमडापूर प्रकल्पाला शेती- घर देणाऱ्या बाधितांच्या स्वप्नाची राखरांगोळी

उमरखेड तालुक्यामधील कुरळी येथील शेतकऱ्यांनी अमडापूर प्रकल्पाला शेती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : उमरखेड Umarkhed तालुक्यामधील कुरळी Kurali येथील शेतकऱ्यांनी farmers अमडापूर Amdapur प्रकल्पाला शेती दिली आहे. १७ वर्ष उलटून गेले आहेत. तरी देखील त्याना अद्यापही स्वईच्छा पुनर्वसन मोबदला मिळाला नाही. यामुळे येत्या ९ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून जिल्हा कचेरीवर कुरळी या ठिकाणी सर्व शेतकरी बेमुदत आमरण उपोषणला बसणार आहेत.

आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणुन देशात ओळख असलेल्या, यवतमाळ जिल्हामधील उमरखेड तालुक्यातील कुरळी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अमडापूर प्रकल्पाला शेती दिले आहे. मात्र, त्यांना शासनाने त्यावेळी साडे बाराशे हेक्टरची मदत केवळ ९५ लाख रूपये देऊन तटपूंजी मदत दिली होती. अद्यापही बाधितांना स्वईच्छा पुनर्वसन मोबदला देण्यात आलेला नाही.

हे देखील पहा-

यामुळे बाधित शेतकरी मागील १७ वर्षापासून संघर्ष करत आहे. ४ वर्षाआधी कुरळी येथील ३४० कुटूंबीयांसाठी प्रत्येकी साडे आठ लाख रूपये देण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ते पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. प्रकल्पाला शेती देणाऱ्या बाधितांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे. यामुळे कुरळी येथील प्रक्लपग्रस्त शेतकरी शासन आणि प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत.

प्रकल्पाला जमीन दिल्यामुळे त्यांचा जगण्याचा आधारच हिरावल्या गेला आहे. आता जगण्याच्या नावाखाली आम्ही रोज मरतोय, असे जीवन जगण्यापेक्षा हे धरणच एकदिवस आम्ही फोडून टाकू मग फाशी झाली तरी बेहतर, अशी उद्विग्न तेवढीच खळबळजनक प्रतिक्रिया अमडापूर प्रकल्पात जमीन गमावलेल्या शेतकरी व्यक्त करत आहे. १९९५ ला सुरू झालेल्या अमडापूर प्रकल्पाची किंमत १० कोटीवरून ४० कोटीवर गेली आहे.

प्रकल्पात भूमीहीन आणि बेघर झालेल्या कुरळी येथील शेतकऱ्यांच्या मागील १७ वर्षापासून स्वईच्छा पुनर्वसन मोबदला करिता संघर्ष सुरू आहेत. धरनग्रस्तांसाठी ४ वर्षापूर्वी ३४० लोकांसाठी प्रत्येकी साडे आठ लाख रूपये देखील आले आहेत. मात्र, अद्यापही त्यांना स्वईच्छा पुनर्वसन मोबदला मिळालेला नाही. यामुळे येत्या ९ ऑगस्ट दिवशी कुरळी वाशीयांनी जिल्हाधिकारी कार्यापुढे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा एल्गार पुकारला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT