Akola : अकोट तालुक्यातील शेतकरी महिलेने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा!
Akola : अकोट तालुक्यातील शेतकरी महिलेने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा! जयेश गावंडे
ऍग्रो वन

Akola : अकोट तालुक्यातील शेतकरी महिलेने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा!

जयेश गावंडे

अकोला : वडाळी देशमुख येथील गट क्रं. 488 मध्ये शहापूर प्रकल्पाचे पाणी येत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून येथील शेती खराब झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांनी याबाबत मागील वर्षी व याही वर्षी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते. प्रकल्पातून येणारे पाणी थांबवावे आणि आमच्या शेतीचे नुकसान थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

हे देखील पहा :

मात्र, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. शेवटी वडाळी देशमुख या गावातील रेखा उत्तमराव वाघ या शेतकरी महिलेने विषारी औषध प्रशान करून आत्महत्या केली. जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने कारवाई न केल्याने माझ्या आईने आत्महत्या केली असल्याचा आरोप रेखा वाघ यांचा मुलगा गणेश वाघ यांनी केली आहे.

जोपर्यंत यावर पाटबंधारे विभाग शहापूर प्रकल्पातील पाणी थांबविण्यासाठी कारवाई करणार, असे लिहून देत नाही, निवेदन दिल्यावर ही पाटबंधारे विभाग सबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत नाही, तोपर्यंत आईचा मृतदेह खासगी रुग्णालयातुन उचलणार नाही, अशी भूमिका मृतकांच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT