चेतन व्यास
वर्धा : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला असला तरी पावसाने नागरिकांना चांगलंच हैराण करून सोडले आहे. आज पुन्हा विजेंच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. दरम्यान शेतात काम करायला गेलेल्या (Farmer) शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सेलू तालुक्यात पिंपळगाव येथे घडली. (Maharashtra News)
वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात पिंपळगाव येथे लक्ष्मण नागतोडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना अचानक विजांसह (Lightning Strike) पावसाला सुरूवात झाली. यावेळी झाडाच्या आडोश्याला गेलेल्या लक्ष्मण नागतोडे हे वीज पडून गंभीर जखमी झाले होते. यानंतर उपचारादरम्यान (Hospital) रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित कले.
पावसाने शेतकरी संकटात
वर्धा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाच्या चांगल्याच सरी बरसत आहेत. पहिले अतिवृष्टी आणी पुराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातच आलेले सोयाबीन पिकही खराब होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सवंगनी करून ठेवलेल तर काहींच्या शेतात असलेलं पीक उध्वस्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.