बुलढाण्यात स्वाभिमानीने भरविला शेतकरी शेतमजूरांचा रणसंग्राम मेळावा...

मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने या सरकारला धडा शिकविला जाईल
Buldhana News
Buldhana Newsसंजय जाधव
Published On

बुलढाणा - बोंड अळी मुक्त कपासी बियाणे व घरकुलच्या मुद्यावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या पातुर्डा गावात स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटना विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजुरांचा रणसंग्राम मेळावा घेन्यात आला. बी जी 4 /बी जी 7 कपाशी बियाणे उपलब्ध करून द्यावे आणि ग्रामीण भागात घरकुल साठी 3 लाखांचं अनुदान द्या. या मागणी साठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

हे देखील पहा -

ग्रामीण भागात अनुदान कमी आणि शहरी भागात अनुदान जास्त असा भेदभाव करण्यात येत आहे त्यामुळे आज स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. आज रणसंग्राम मेळावा घेऊन स्वाभिमानिने सरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे या मेळाव्याला शेतकऱ्यांची हजारोच्या संख्येत उपस्थित होती मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने या सरकारला धडा शिकविला जाईल असा इशारा यावेळी प्रशांत डिक्कर यांनी सरकारला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com