Loss Of Raisin In Sangli : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) सांगली (sangli) आणि साेलापूर (solapur) जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांना माेठा ताेटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यातून यंदा 14 हजार टनाच्या आसपास द्राक्षाची (grapes) निर्यात झाली असताना दुसरीकडे निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आलेल्या अवकाळी पावसाने शिल्लक राहिलेल्या द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा (raisin) उत्पादकाची चिंता वाढवली आहे. (Maharashtra News)
योग्य दर न मिळाल्याने अजून सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागाची निर्यात झाली नाही. त्यामुळे एकीकडे दर नाही आणि दुसरीकडे चार दिवसांपासून अस्मानी संकट निर्माण झाल्याने द्राक्षचे नुकसान होत आहे.
दुसरीकडे बेदाणा करण्यास टाकलेली द्राक्षे देखील झालेल्या पावसाने खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे सध्या दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी अडकला आहे. शासनाने तातडीने लक्ष देत द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा राजाराम पवार यांनी व्यक्त केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.