
जालना : जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथील महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनास सुरवात केली. रब्बी हंगामात पिकांना पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. (Letest Marathi News)
यंदा जिल्ह्यात चांगला (Rain) पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली आहे. पिकंही चांगली तरळू लागली. मात्र पाणी द्यायची वेळ आली असताना वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून बिलाच्या (Jalna News) वसुलीसाठी आडून पाहिले जात आहे. हजारो शेतकऱ्यांची वीज खंडीत केली आहे.
शेतकरी संतप्त
आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असताना त्यात आता रब्बी पिकांवर महावितरणच्या रुपाने सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या मागणीसाठी भोकरदन येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालयासमोर शेतकर्यांनी ठिय्या सुरु केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.