Latur: बाब्बो! चार गावाच्या शेतकऱ्यांनी तब्बल 500 एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर

राज्यातील पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फिरवलं ट्रॅक्टर; फुलगळ आणि शेंगाची लागण झाली नसल्याचा परिणाम
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - सोयाबीनचे कोठार असलेल्या लातूर (Latur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चार गावांच्या अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांवर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. यामुळे किमान तीन कोटी रुपयांचा फटका चार गावाच्या शेतकऱ्यांना (Farmer) बसला आहे. राज्यातील ही पहिलीच घटना असावी. (Latur Latest News)

Latur News
Beed News : दसरा मेळाव्यासाठी वसूल केली जातेय खंडणी? शिंदे गटाचा नवा आरोप

लातूर जिल्हा हा सोयाबीन कोठार अशी ओळख असलेला जिल्हा. या जिल्ह्यात सहा लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी किमान साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. दुर्दैवाने याच सोयाबीन कोठार अशी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्याला अतिवृष्टी गोगलगाय मोझक रोगाचा धोका झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

औसा तालुक्यातील लाडवाडी, गाढवेवाडी, गाडवेवाडी तांडा, तपसे चिंचोली, नागरसोगा या गावांच्या शिवारातील किमान पाचशे एकर क्षेत्रावरील सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फुलगळ आणि शेंगांमध्ये दाणे भरले नसल्यामुळे नुकसानीत येत असलेल्या शेतकऱ्यांनी सव्वाशे शेतकऱ्यांनी किमान 500 एकर क्षेत्रावर रोटावेटर फिरवून नष्ट केले आहे.

यासाठी किमान एकंदरीत साठ लाखांचा खर्च आला तर या सोयाबीन पासून मिळणारे किमान तीन कोटी रुपयांचे उत्पन्न हातातून गेले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना जगावं कस असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी शासकीय धोरणावर आपला संताप व्यक्त करत आहेत. या शेतकऱ्यांना तातडीची शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com