लातुरात पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान; विमा कंपनीला 338 कोटींचा नफा !

चालू वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पूर निर्माण झाली. हाती आलेलं पीक वाहून गेलं या हंगामात शेतकऱ्यांनी 637 कोटी विमा भरला पण जिल्ह्यात केवळ 299 कोटी निव्वळ नफा झाला आहे.
लातुरात पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान; विमा कंपनीला 338 कोटींचा नफा !
लातुरात पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान; विमा कंपनीला 338 कोटींचा नफा !दीपक क्षीरसागर
Published On

दीपक क्षीरसागर

लातूर : चालू वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पूर निर्माण झाली. हाती आलेलं पीक वाहून गेलं. या हंगामात शेतकऱ्यांनी 637 कोटी विमा भरला पण जिल्ह्यात केवळ 299 कोटी निव्वळ नफा झाला आहे. याविरुद्ध शेतकऱ्यांची पोरं या संघटनेने आवाज उठवला असून विमा कोणत्या निकषांवर दिला यांची माहिती देत वाढीव विमा द्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलनाचं इशारा दिलाय.

लातुर जिल्ह्यात सरासरी 6 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असून त्यात 4 लाख 80 हजार हेक्टर सोयाबीन, 80 हजार हेक्टर तूर आणि इतर पिकांची पेरणी झाली होती. चालू वर्षी 2021 खरीप हंगामात जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. त्यात शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी 637 कोटी रुपयांचा विमा हप्ता लातुर जिल्ह्यातील पिकविम्यासाठी भरणा केला.

लातुरात पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान; विमा कंपनीला 338 कोटींचा नफा !
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने केला महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे हाती आलेलं पीक वाया गेला. पण, आता पीक नुकसान जास्त आणि पीकविमा कमी आल्याने औसा तालुक्यातील उजनी गावच्या शेतकरी पुत्रांच्या 'शेतकऱ्यांची पोरं' एक संघटनेने यावर कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी एस. डी. गावसाने यांच्याकडे तक्रार केली. नुकतीच कृषी अधिकारी शेतकरी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. मोठं नुकसान होऊन सुध्दा चालू वर्षी विमा कंपनीच धोरण शेतकऱ्यांच मरण हेच झाले आहे. पीकविमा कंपनीला तब्बल 238 कोटी रुपयांचा नफा एकट्या लातुर जिल्ह्यात झाला आहे.

हे देखील पहा-

सद्या जवळपास 60 % शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला आहे. तर आणखी 40 % शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. या शेतकऱ्यांना 10 जानेवारीपर्यंत विमा अदा केला जाणार असून यासोबतच कोणत्या पिकाला किती आणि कोणत्या निकषांवर विमा दिला गेला आहे याची माहिती द्यावी अशी मागणी होत आहे. तर, कमी विमा मिळाल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत येणार असून विमा कंपनीने यावर समाधान केले नाही तर आगामी काळात आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com