बीड : निसर्गाचा लहरीपणा कधी कसा ओढावेल? याचा काही नेम नाही. त्यामुळे काहीसा आधार म्हणून जिल्ह्यातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांनी आपल्या विविध पिकांचा विमा (Crop Insurance) भरला आहे. जवळपास 6 लाख हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी (Farmer) हा विमा भरलाय. (Beed News Farmer Crop Insurance)
गेल्या काही वर्षभरापासून निसर्गाचा समतोल (Beed News) बिघडू लागला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत असल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विविध कंपन्यांच्या मार्फत विमा भरून घेतला जातो. यावर्षी विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती.
सोयाबीन, कापूस पिकांचा विमा
जिल्ह्यातील 16 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी 6 लाख 27 हजार हेक्टरवरील पिकांसाठी विमा भरला आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस (Cotton) या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांचा जास्त प्रमाणात विमा भरण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.