Yashomati Thakur News | देशात INDIA आघाडीचं सरकार बनतंय? यशोमती ठाकूर असं का बोलल्या?
देशात लोकसभेचे निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतंय. अशातच देशात तानाशहा की दुकान बंद हो रही है और मोहब्बत की दुकान खुल रही है, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली. मागील दहा वर्षात सत्ताधारी मोठ्या आरेरावीने वागले आहेत. सरकार आणि पक्ष तोडण्याचे प्रयत्न त्यांनी केले. ते कुणालाही आवडलं नाही. आम्ही देवाचे आभार मानतो. देवाने आम्हाला साथ दिला आणि अयोध्येमध्ये श्रीरामाने आम्हाला साथ दिली. सर्व देव आमच्यासोबत होते. त्यामुळे देशात इंडिया आघाडीचे सरकार बनणार आणि संविधान रक्षक या देशावर राज्य करतील आणि संविधानाची रक्षा करतील, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.