लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे यांनी 'साम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत मातंग समाजासाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी अधिक तीव्र केली आहे. 'जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही,' असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या मागणीसाठी २ नोव्हेंबरपासून मुंबई ते नागपूर अशी १४०० किलोमीटरची पायी पदयात्रा काढण्यात येणार असून, ही यात्रा १२ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.
या आंदोलनात देशभरातील सात ते आठ राज्यांमधील मातंग समाज सहभागी होणार आहे. महायुतीसोबत असलेल्या संबंधांवर बोलताना, त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दहा जागांची मागणी केली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे आरक्षणाचा निर्णय रखडला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.