Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकारचं!

Nashik Vijay Wadettiwar News: विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्वावरुन पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. त्या बजेटवरुन विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. म्हणाले, अर्थसंकल्प म्हणजे धूळफेक होती.ज्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांच्या मर्जी सांभाळणाारे हे बजेट होतं,नव्याने काहीही दिलं नसून, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.त्याचबरोबर कांद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यात झालेय. मात्र महाराष्ट्राला आणि गुजरातला एक न्याय दिला जातोय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. सगळे उद्योग गुजरातला पळून नेले जात आहेत, गुजराती माणसाला दिले जात आहेत. असा घणाघात वडेट्टीवारांनी सरकारवर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com