रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय असलेला वरंध घाट मार्ग आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरवर्षी पावसात या घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने आणि अपघातांचा धोका वाढत असल्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही अधिसूचना जारी केली आहे.या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटाचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे.
वरंध घाट हा खुप पुरातन मार्ग असून, रायगड, कोकण आणि पुणे यांना जोडणारा एक निसर्गरम्य आणि लहान अंतराचा मार्ग आहे. पण पावसाळ्यात या घाटात दगड-धोंडे पडणे, रस्ते निसरडे होणे आणि अपघात होणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.