Ulhasnagar News : गटाराच्या पाण्यात धुतल्या भाज्या, नागरिकांच्या जीवाशी खेळ; पाहा VIDEO

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये गटाराच्या घाणेरड्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून भाजी विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

उल्हासनगरमधून गटाराच्या पाण्यात बुडवून पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे किळसवाणे काम करणाऱ्या भाजीवाल्यावर उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील खेमाणी परिसरात भाजी मार्केट आहे. या मार्केटमधल्या पोस्ट ऑफिससमोरच्या उघड्या गटाराच्या पाण्यात भाजी विक्रेते भा्ड्या बुडवून धुत असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही, तर हे भाजी विक्रेते गटाराचे पाणी बादलीत घेऊन भाज्यांवर मारतात आणि भाज्यांची विक्री करतात अशी माहिती समोर आली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. पण या भाज्याच जर अशा गटाराच्या पाण्यात बुडवल्या जात असतील, तर आरोग्याला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल. या प्रकरणामुळे तेथील भाजी विक्रेत्यांवर कारवाई केल्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com