Sujay Vikhe Patil On Sharad Pawar | अहमदनगरच्या विकासावरून सुजय विखे पाटलांचा पवारांना टोला

Sujay Vikhe Patil On Sharad Pawar News Today | भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर अहमदनगरच्या विकासावरून टोला लगावला आहे. शरद पवार हे पाच वर्षांनी अहमदनगर शहरात येत आहेत. त्यांचं मी स्वागतच करतो. मात्र त्यांनी अहमदनगरमध्ये येताना आम्ही केलेले बायपास उड्डाणपूल याच्यावरून शहरात यावे. जेणेकरून त्यांनाही कळेल की, अहमदनगर शहराचा विकास झालेला आहे.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात आलीये. १८ एप्रिलपासून निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झालीये. अशातच भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर अहमदनगरच्या विकासावरून टोला लगावला आहे. शरद पवार हे पाच वर्षांनी अहमदनगर शहरात येत आहेत. त्यांचं मी स्वागतच करतो. मात्र त्यांनी अहमदनगरमध्ये येताना आम्ही केलेले बायपास उड्डाणपूल याच्यावरून शहरात यावे. जेणेकरून त्यांनाही कळेल की, अहमदनगर शहराचा विकास झालेला आहे. तसेच जिल्ह्यातल ज्या ज्या ठिकाणी ते सभा घेतील, त्या त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाताना ते रस्ते पाहतील आणि त्यांनाही कळून चुकेल. गेल्या पाच वर्षात अहमदनगर शहराचा आणि जिल्ह्याचा किती मोठा विकास झालेला आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी मारला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com