EXCLUSIVE: जरांगेचा प्रश्न येताच दानवेंची काय उत्तर दिलं? Video समोर! जालन्यात पराभव का झाला?
नवी दिल्ली : जालन्याचे महायुतीचे उमेदवार आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीवर सविस्तर भाष्य केलं. इतकंच काय तर जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यात टर्निंग पॉईन्ट ठरला का? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. योग्य वेळी यावर बोलू, असं म्हणत दावनेंनी उत्तर देणं टाळलं. दरम्यान, दानवेंनी यावेळी पराभवाची कारणं काय आहेत, यावरही मोठं भाष्य केलं. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुरलीधर मोहोळही होते. परभवाची समीक्षा करणार असल्याचं विधान यावेळी दानवेंनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.