महाराष्ट्रात लोकसभेपूर्वी ३२ लाख मते आणि विधानसभेपूर्वी ३९ लाख मते जोडली गेली. ५ महिन्यांत ७ लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. महाराष्ट्रात ९ कोटी ५४ लाख लोकसंख्या असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी ३९ लाख मतदान वाढले, असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाल्याच्या आरोपवर आज राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मतदार यादी, नावे आणि पत्ते आम्ही मागवले आहेत. त्यांची छायाचित्रेही द्यावीत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे. पाच वर्षात ३४ लाख मतदार वाढले आहेत. त्यामुळे आम्हाला नाव आणि पत्त्यासह मतदार यादी हवी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या पौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तसंच शिर्डीच्या एका इमारतीमध्ये ७ हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट होतात. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती, असं सांगत राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.