प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे. काल राणा दांपत्याने फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आज बच्चू कडू यांनी शिंदेंची भेट घेतली आहे. या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीच कारण काय असेल याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात असलेला वाद हा सर्वश्रुत आहे. कालसुद्धा त्यांच्यात घमासान झालं होतं. त्यानंतर काल नवनीत राणा फडणवीस यांच्या भेटीला तर आज बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. बच्चू कडू लोकसभेत देखील राणा यांच्या उमेदवारीवरून नाराज होते. यावेळी विधानसभेत बच्चू कडू यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. या भेटीत राणा दाम्पत्याशी असलेल्या वादावर चर्चा होऊ शकते. तसंच त्यांच्या पराभवावर देखील चर्चा होऊ शकते. आगामी काळात प्रहारची भूमिका काय असणार, बच्चू कडू काय निर्णय घेणार अशा अनेक मुद्यांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.