NCP News: सोडून गेलेले पुन्हा परत येणार? Jayant Patil यांच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण
शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार परत येतील, योग्य वेळेची वाट पाहत राहा, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत पाच पैकी फक्त एक जागा जिंकता आली. इतकंच काय तर मोदींच्या मंत्रिमंडळातही फक्त राज्यमंत्रीपदी बोळवण करण्यात आली. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे नवी राजकीय कुजबूजही सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून आज वर्धापन दिन साजरा केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडून आलेल्या सूचक विधानामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.