VIDEO: Kalyan मधील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण

Kalyan News: कल्याण मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश, आमदार, 14 गावाच्या विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई मधून मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवी मुंबई पालिकेत समावेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण मतदारसंघातील १४ गावांचा नवी मुंबई मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती. याबाबत अनेक आंदोलन करण्यात आली काही काळासाठी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट होती परंतु ती पुन्हा वगळण्यात आली. परंतु या 14 गावाच्या विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नातून गावांचा नवी मुंबई मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले असून 14 गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला 11 तारखेपासून सुरवात होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com